ताज्या घडामोडी

सरकारी कार्यक्रम आणि शाळांमध्ये राष्ट्रगीतापूर्वी पूर्ण ‘वंदे मातरम्’ च्या सहा कडव्यांचे गायन अनिवार्य; गृह मंत्रालयाची नवीन नियमावली

सरकारी कार्यक्रम आणि शाळांमध्ये राष्ट्रगीतापूर्वी पूर्ण ‘वंदे मातरम्’ च्या सहा कडव्यांचे गायन अनिवार्य ; गृह मंत्रालयाची नवीन नियमावली

नवी दिल्ली : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार यापुढे सरकारी कार्यक्रम, शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रगीत ‘जन गण मन’ गाण्यापूर्वी राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ ची सर्व सहा कडवी पूर्णपणे गायली जाणार आहेत

हा नियम केंद्रीय गृह मंत्रालयाने २८ जानेवारी रोजी जारी केलेल्या आदेशात नमूद केला असून, तो तात्काळ सर्व पातळ्यांवर लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी १८८२ मध्ये ‘आनंदमठ’ मध्ये प्रथम लिहिलेले हे राष्ट्रीय गीत स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्रोत ठरले होते. यापूर्वी केवळ पहिल्या कडव्यांचे सादरीकरण केले जात असे, पण आता सर्व सहा कडवी गायली जातील. या पूर्ण गायनासाठी नेमके ३ मिनिटे १० सेकंदांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. 

राष्ट्रपतींचे आगमन, ध्वजारोहण, राज्यपाल किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकाऱ्यांचे भाषण यांसारख्या अधिकृत कार्यक्रमांमध्ये ही नियमावली काटेकोरपणे लागू होईल. जेव्हा दोन्ही गीते एकत्र गायली जातील, तेव्हा प्रथम राष्ट्रीय गीत आणि नंतर राष्ट्रगीत, असा क्रम असेल.

१९५० मध्ये घटनेने ‘जन गण मन’ ला राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्’ ला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला. स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रीय गीताच्या पूर्ण सादरीकरणाबाबत वाद झाले होते, कारण काहींनी त्यातील धार्मिक संदर्भांचा मुद्दा उपस्थित केला होता. गृह मंत्रालयाने याला दूर करत राष्ट्रीय प्रतीकांच्या शिस्तीला प्राधान्य दिले आहे. गायनादरम्यान उपस्थित सर्वांना सावधान स्थितीत उभे राहणे, हात जोडणे किंवा सॅल्युट देणे बंधनकारक असणार आहे. 

गृह मंत्रालयाने ऑनलाइन पोर्टलवर पूर्ण गीताचे ऑडिओ उपलब्ध करून दिले असून, सर्व संस्थांना डाउनलोड करण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??